गावाविषयी माहिती
ग्रामपंचायत उसर ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे.सदर ग्रामपंचायत उसर महसूल गाव आहे. तर मोहोट्याचापाडा, पळसपाडा, शिंदेवाडी, कोलकेवाडी हे पाडे आहेत.
१.उसर ग्रामपंचायत हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेले एक ग्रामपंचायत आहे, जेथे प्रामुख्याने मराठी बोलीभाषा बोलली जाते, पिनकोड ४२१३१२ आहे आणि ते वाडा तालुक्याच्या जवळ (सुमारे 19 किमी) आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे 58 किमी दूर आहे, हि ग्रामपंचायत नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. ग्रामपंचायत हद्दीतून तानसा नदी जात असून, ती गावाची जीवनदायीनी आहे.
२. २०११ च्या जनगणनेनुसार 1202 लोकसंख्या आहे, हे गाव उत्तर कोकणातील वाडा तालुक्यात येते आणि एक शांत, ग्रामीण भाग आहे, जिथे शेती आणि स्थानिक जीवनशैली आढळते.
३. ST, SC, OBC, Open लोकवस्ती असून, वाडा तालुक्याच्या उत्तरेकडील भागात येते. शेती प्रधान आणी औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
मुख्य माहिती:
सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायत ची लोकसंख्या सुमारे 1202 आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 3, अंगणवाडी केंद्रे ०4,ग्रामपंचायत कार्यालय 01 तसेच डावजई माता मंदिर,गावदेवी मंदिर 02, श्री दत्त मंदीर,हनुमान मंदीर, दर्गा अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत.
ग्रामपंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी हातपंप, विद्युतपंप , विहिरी तसेच नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत,
गावातील बहुतांश लोक शासकीय कर्मचारी असून काही लोक शेती ,भाजीपाला लागवड सुद्धा करतात. ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने आहेत त्यामुळे गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. उसर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.उसर ग्रामपंचायत आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.